अकोल्यात आठ दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद

अकोल्यात आठ दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद
अकोल्यात आठ दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद

पुणे ः उष्णतेच्या अतितीव्र लाटेमुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे काही भागांत उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. विदर्भातील अकोला येथे गेल्या सात दिवसांपासून उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत अकोला येथे ४६.९ अंश सेल्सिअस तापमान होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.     उष्णतेच्या लाटेमुळे सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी चटका वाढून उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर होते. अकोल्यात गेल्या आठवड्यातील मंगळवार (२३ एप्रिल) वगळता आत्तापर्यत उच्चांकी तापमान नोंदविले गेले आहे. मराठवाड्यातही तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळा तीव्र असल्या, तरी दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमानात चढउतार होतो. कोकणात ढगाळ हवामानामुळे तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.   बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. येत्या दक्षिण महाराष्ट्रात शनिवारी, काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पुणे परिसरातही शनिवारी व रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.   फणी चक्रीवादळाची तीव्रता वाढली  बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फणी चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. चक्रीवादळामुळे ताशी १६ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. हे चक्रीवादळ श्रीलंकेतील त्रिकोमाली येथून पूर्वेकडे ६७० किलोमीटर, चेन्नईच्या आग्नेय दिशेला ६९०, तर आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टनमपासून आग्नेय दिशेला ७६० किलोमीटर अंतरावर आहे. उद्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार असून, वारे वेगाने वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील दक्षिणेकडील भाग व विदर्भातील काही भागांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मंगळवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.२ (२.३), जळगाव ४५.२ (२.५), कोल्हापूर ३७.२ (०.२), महाबळेश्‍वर ३४.० (२.३), मालेगाव ४३.२ (२.७), नाशिक ३९.२ (०.६), सांगली ३९.२ (०.६), सातारा ४०.६ (३.९), सोलापूर ४३.४ (२.६), सांताक्रूझ ३४.६ (१.४), अलिबाग ३५.४ (३.१), रत्नागिरी ३३.३ (०.७), डहाणू ३७.३ (३.९), औरंगाबाद ४३.१ (३.७), बीड ४४.४ (३.९), नांदेड ४४.५ (२.४), परभणी ४५.८ (४.३), उस्मानाबाद ४३.३ (४.१) अकोला ४६.९ (४.९), अमरावती ४६.८ (४.७), बुलडाणा ४३.५ (५.३), चंद्रपूर ४६.६ (३.९), गोंदिया ४३.० (१.५), नागपूर ४४.८ (२.८), वर्धा ४५.८ (३.६), वाशिम ४५.०, यवतमाळ ४५.५ (४.०).    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com