अमरावती ः आधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांचा थेट बांधावर जात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ही पालन या कार्यक्रमात करण्यात आले.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विदर्भातील प्रयोगशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरविले जाते. यावर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याने हा सोहळा होणार किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कॉंग्रेस नेते प्रकाश साबळे यांनी मात्र दरवेळीप्रमाणे सभागृहात हा सोहळा न घेता थेट बांधावरच जात शेतकऱ्यांना गौरविण्याचा निर्णय घेतला.
ज्ञानेश्वर नांदणे (देवरा), डॉ. दीपक पाळेकर (शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती), प्रकाश मोहोड (धामोरी), योगिनी अर्डक (कृषी पत्रकार), रामभाऊ खडके (कुलांगणा खुर्द), दीपिका मानेकर (सायत), ऋषिकेश सोनटक्के (टाकरखेडा मोरे), अनुप गांजरे (सुरळी), मंजूताई पिल्हारे (अंजनवती), अनिल आडे (फुलआमला), नरेंद्र नाल्हे (आमला विश्वेश्वर), नरेंद्र उभाड (भिलोणा), सुनील बनसोड (शिवणी रसुलपूर), प्रफुल्ल हेलोडे (मोर्शी) यांचा थेट बांधावर जात सत्कार करण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.