बागायती पिके पाण्याअभावी वाळू लागली

Horticultural crops began to fall due to lack of water
Horticultural crops began to fall due to lack of water

ढेबेवाडी, जि. सातारा : ऊस व गव्हासह अन्य बागायती पिके पाण्याअभावी वाळायला लागली असतानाही मराठवाडी धरणातून पाणी सोडले जात नसल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. धरणातून पाणी सोडायचे योग्य नियोजन करा, अन्यथा धरणाच्या भिंतीवर ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मराठवाडी धरणात दहा वर्षांपासून पाणी अडविण्यात येत आहे. गतवर्षी सांडव्याचे बांधकाम हाती घेण्यात आल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता ०.६० टीएमसी वरून जवळपास दुप्पट वाढली आहे. या धरणाचे लाभक्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत असून, वांग नदीवर ठिकठिकाणी दहा बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यापैकी आठ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

धरणातील पाण्याच्या भरवशावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्र वाढवले आहे. नदीतील नैसर्गिक प्रवाह थांबल्यावर हिवाळ्याच्या दरम्यान धरणातून पाणी सोडण्याची रोटेशन सुरू होतात. साधारणपणे पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत ती सुरू राहतात. यावर्षी धरणात जवळपास दुप्पट पाणीसाठा झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी व नागरिक शेती आणि पिण्याच्या पाण्याच्याबाबत निर्धास्त झाले आहेत.

धरण तुडुंब भरलेले असतानाही पाणी सोडण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. आवश्‍यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पीक नुकसानीला पाटबंधारे विभागाला जबाबदार धरण्यात येईल. - डी. एस. पाटील, शेतकरी, गुढे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com