पुणे : राज्यात यंदा जलाशयांमध्ये पाण्याची पातळी चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांना फळबागा वाढविण्यास वाव आहे. त्यामुळे लागवडीसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून फळबागेसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. या योजनेचे आयुक्त ए.एस.आर. नायक यांनी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता. नियोजन विभागातील रोजगार हमी योजनेचे उपसचिव डी. एस. खताळ यांनी हा प्रस्ताव मान्य झाल्याचे कृषी विभागाला कळविले आहे. “मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी उपलब्ध झाला आहे. यंदा राज्यात ५९ हजार हेक्टर क्षेत्रावर कल्पवृक्ष तसेच फळबाग लागवडीला मान्यता दिली गेली आहे,” असे शासनाचे म्हणणे आहे. फळबाग लागवडीची स्थिती...
प्रतिक्रिया... रोहयोमधून फळबागांची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रचार केला जात आहे. मात्र सहभागाची मुदत नोव्हेंबरअखेर संपुष्टात येत होती. आता एक महिन्याची मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुदतीत लागवड करावी. अर्थात, लागवड साहित्य मान्यताप्राप्त खासगी व सरकारी रोपवाटिकांमधून मिळवण्याची दक्षता घ्यावी. - डॉ. कैलास मोते, कृषी संचालक (फलोत्पादन)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.