संकटातील फळबागा वाचविण्याची धडपड

आटते पाणीसाठे व जलस्रोत पाहता अनेक वर्षे जोपासलेल्या फळबागांवर भीषण संकट आहे. परंतू दुष्काळी परिस्थितीत तज्ज्ञांनी सांगितलेले फळबागांचे व्यवस्थापन, पाचट, प्लॅस्टिक आच्छादन, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या केल्यास जिवापाड सांभाळलेल्या बागा वाचविता येतील. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना
दुष्काळ फळबागा
दुष्काळ फळबागा

जालना: जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात आला आहे.  यंदाचा दुष्काळ मराठवाड्यातील फळबागांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. पाण्याचे भीषण संकट, दरदिवशी आटत चाललेले स्रोत यंदा बागा वाचतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. जालना जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास २४ हजार ४३० हेक्‍टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आदी फळपिकांच्या बागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, जालना, मंठा, बदनापूर तालुक्‍यातील, मोसंबी, डाळींब, द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत. शिवाय नव्याने झालेली  लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टॅंकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय दरदिवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचविता येतील का यासाठी कृषी विभागाने ''वाचवा अभियान'' हाती घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार फळबाग वाचवा अभियानांतर्गत आतापर्यंत घनसावंगी तालुक्‍यातील बोधलापूरी शिवारातील जवळपास १६० हेक्‍टरवर फळबागा वाचविण्यासाठी आच्छादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय बाचेगाव शिवारात १८० हेक्‍टरपैकी ९० हेक्‍टरवर तर वडी, रामसगाव शिवारातील ९० हेक्‍टर फळबागांपैकी जवळपास ५० हेक्‍टर फळबागांवर आच्छादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फळबाग वाचवा अभियानात सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सजग करण्याचे काम केले जात असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.  झाडांच्या वयोमानानुसार फेब्रुवारी ते जुनदरम्यान प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचविण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचविण्याचे काम कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून केले जात आहे.  अभियानात यावर दिला जातो आहे भर 

  • आच्छादनाचा वापर 
  • मडका सिंचनाचा उपयोग 
  • सलाइनच्या बाटल्यांचा वापर 
  • खोडास बोर्डोपेस्ट लावणे 
  • बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी 
  • झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com