जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात गिरवताहेत उपाशीपोटी धडे

पोषण आहार योजना
पोषण आहार योजना

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार बंद झाल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शासन आणि पुरवठादार यांच्यातील करार संपुष्टात आल्याने पुरवठादारांकडून धान्य, अन्य मालाचा पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे. परिणामी, शाळांत पोषण आहार शिजत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत आहार घेण्याची सवय लागली असल्याने आता उपाशीपोटी त्यांना वर्गात बसावे लागत असल्याची स्थिती आहे.

शालेय पोषण आहारातील धान्य, मालाचा पुरवठा करण्यासाठी गुणिना कमर्शिअल प्रा. लि. कंपनीस ठेका देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनातर्फे गेल्या वर्षी त्यासाठी करार करण्यात आला होता. हा करार १४ फेब्रुवारीपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे शाळांना तांदूळ वगळता होणारा धान्याचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. ज्या शाळेत माल शिल्लक आहे, तेथे आहार पुरवठा सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी माल संपला आहे, तेथील आहार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. 

शासनाने दखल घेऊन तातडीने पुरवठादार नेमून आहार पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी केली. जिल्ह्यातील शिक्षकांकडून यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. पोषण आहार पुरवठा बंद झाल्याची तक्रार केल्याचे पोपट भोळे यांनी सांगितले. 

  स्थानिक स्तरावर माल खरेदी करा

पोषण आहारासाठी आवश्‍यक साहित्याचा पुरवठा थांबल्याने शाळांकडील शिल्लक माल संपला आहे. शासनाने नवीन पुरवठादाराशी करार होईपर्यंत स्थानिक स्तरावर माल खरेदीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भोळे यांनी केली. अद्यापही अनेक शाळांकडे माल शिल्लक आहेत, त्यांनी तो इतर शाळांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com