पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील सुक्रे या शेतकरी तरुणाने केंदूर ते मुंबई असा मोटरसायकलने प्रवास करत आपल्या शेतातील भाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर नेऊन दिली. साहेबांना भाजी पोच केल्यावर मला खूप आनंद वाटत असल्याचे सुनील म्हणाले.
मुंबईपासून २०० किलोमीटर असलेल्या केंदूरवरून दुचाकीने प्रवास करून या शेतकऱ्याने पवार यांच्या घरी शुक्रवारी (ता. २२) भाजीपाला पोच केला. या घटनेबाबत पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये ‘‘सुनील सुक्रे या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे,’’ असे म्हटले आहे.
सुनील म्हणाले, ‘‘शरद पवार हे आम्हा शेतकऱ्यांचे आधारवड आहेत. शेतकऱ्यांवर कसलीही वेळ आली, तर ते आधार द्यायला येतात. अशा नेत्याला माझ्या शेतातील भाजी द्यावी अशी इच्छा होती. मी आज सकाळी पहाटे गावातून मुंबईला गेलो. साहेबांना भाजी पोच केल्यावर मला खूप समाधान वाटत आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.