वाढत्या उष्णतेचा गव्हाला फटका

wheat irrigation
wheat irrigation

जळगाव : जिल्ह्यात यंदा मुबलक जलसाठे व सुरुवातीचे अनुकूल वातावरण यामुळे उत्पादनातही वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला उष्णतेचा फटका बसत असून, दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याची गरजही वाढल्याने शेतकरी चिंतीत आहेत.  सध्या किमान तापमान २१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. सकाळी गारवा असतो. तर दुपारी तापमान वाढते. चार वाजेपर्यंत तापमान ३५ अंशांपर्यंत पोचते. अलीकडे तापमान वाढत असून, या वाढत्या तापमानाचा उशिराच्या म्हणजेच जानेवारीत पेरणी केलेल्या गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. गहू पिकाची पेरणी मागील हंगामात कमी झाली होती.   जिल्ह्यात गव्हाची सुमारे २८ हजार हेक्‍टरवर विक्रमी पेरणी झाली आहे. यात उशिराच्या गव्हाची पेरणी पाच ते साडेपाच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक आहे. या गव्हाला थंडीची गरज आहे.  उत्पादकतेवर परिणाम शक्य उष्णता वाढल्याने हलक्‍या, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत पाण्याची गरज वाढली आहे. दाणे पक्व होण्याची क्रिया मंदावली असून, कापणी व मळणीलादेखील उशीर होईल, अशी स्थिती आहे. उशिराच्या गव्हाची स्थिती काळ्या कसदार जमिनीतही चांगली नाही. त्यात तण वाढले आहे. किमान पाच वेळेस काळ्या कसदार जमिनीत सिंचन करण्याची वेळ येणार आहे. पुढे उष्णता वाढली तर उत्पादन एकरी पाच ते सहा क्विंटलदेखील येणार नाही, अशी स्थिती झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com