वर्धा ः वर्धालगतच्या तीन जिल्ह्यांमध्ये ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून भाजीपाला, फळे, दूध तसेच मांस वर्धा जिल्ह्यात आणण्यास २० मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हास्तरीय बैठकीत प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे विनंती केली की, नागपूर, अमरावती व यवतमाळ हे तीन ‘कोरोना’बाधित जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातून होणारी वाहतूक लॉकडाऊन काळापर्यंत थांबविल्यास वर्धा जिल्हा ‘कोरोना’मुक्त राहू शकतो.
या आजूबाजूच्या जिल्ह्यांतून भाजीपाला, फळे इत्यादी वस्तूंची वाहतूक करताना सुमारे १५०० ते १७०० व्यक्ती या जिल्ह्यांतून वर्धा जिल्ह्यात येतात. त्यामुळे त्यांच्यासोबतच ‘कोरोना’चा विषाणू जिल्ह्यात प्रवेश करू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता वाहतूक बंदी कायम ठेवावी. यामध्ये चार जिल्ह्यांतून होणारी फळ, भाजी व मांस यांची वाहतूक करण्यास पूर्णतः बंदी राहील. तसेच वर्धा जिल्ह्यातून या वस्तू बाहेर पाठविण्यासही बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा अंतर्गंत वाहतूक व विक्रीस कोणताही प्रतिबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.