लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व ः द्विवेदी

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व ः द्विवेदी
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व ः द्विवेदी

नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. ही व्यवस्था टिकवण्याचे आणि बळकट करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच, लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्त्व असाधारण आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांची मतदार नोंदणी करून निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,’’ असे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले.

दहाव्‍या राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी  सुधाकर भोसले, उपजिल्‍हाधिकारी रोहिणी नऱ्‍हे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार उमेश पाटील, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, रमाकांत काटमोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, महिला व बालविकास अधिकारी विजयमाला माने या वेळी उपस्थित होत्या.

सकाळी मतदार जागृती रॅलीस जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरुवात झाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. ही रॅली टिळक रस्त्यामार्गे आयुर्वेद महाविद्यालय चौक, जुनी महापालिका इमारत, पंचपीर चावडी, माळीवाडा वेस, महात्मा गांधी पुतळ्यामार्गे काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. या वेळी उपस्थितांना मतदानाचे महत्त्व पटविण्याबाबतची प्रतिज्ञा देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com