जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक वातावरण व पाणी’ घोषित केले आहे. या वर्षातील २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन, तर २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून ६९ वर्षांपासून साजरा केला जातो. यावर्षी ‘वातावरण आणि पाणी’ अशी संकल्पना घेतली असून, या निमित्ताने जनजागृतीचे विविध कार्यक्रम केले जात आहेत. पाण्याचे महत्त्व आपल्याला त्याच्या कमतरतेच्या वेळी म्हणजेच दुष्काळामध्ये जाणवते. दुष्काळ हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या पाचवीला पुजलेला आहे. तो पुन्हा–पुन्हा (जवळपास दर तीन वर्षांनी) येतो. दुष्काळामुळे भारताचा जवळपास ७० टक्के भाग बाधित होतो. (आकृती-१). दुष्काळाची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. परंतु सर्व समावेश, साधी सोपी व्याख्या आपण पाहू. दुष्काळ म्हणजे मानव, प्राणी, पीक, झाडे-झुडपे यांच्या चयापचय क्रियेस पुरेल एवढे (दैनंदिन वाढ व विकास होण्याइतपत) पाणी सतत काही दिवस (आठवडा, महिना इत्यादी) उपलब्ध न झाल्यास, अशा परिस्थितीस आपण दुष्काळ म्हणतो. थोडक्यात सर्व सजीवांच्या दैनंदिन क्रियेस पाण्याचा तुटवडा जाणवला तर त्याला दुष्काळ मानले जाते. विसाव्या शतकात जगभरात पाण्याच्या कमतरतेमुळे ७० दक्षलक्ष लोक मरण पावल्याची नोंद स्टिफन डेरिक्स यांनी आपल्या ‘फिमाईन इन द टेवेन्टीएथ सेंचुरी’ या संशोधनामध्ये केली आहे. पृथ्वीवरील जवळपास २० टक्के लोकांना आणि १५ टक्के पशुधनाला (भारतीय लोकांना व पशुधनास) एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त २ टक्के क्षेत्र आणि १.५ टक्के वनकुरण व जंगल वाट्याला आले आहे. भारतात शेतीखाली असणाऱ्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र हे दुष्काळ प्रवण आहे. ही बाबच भारताच्या दृष्टीने पाण्याचे मोल अधोरेखित करणारी आहे. भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी शेतीखाली असणाऱ्या क्षेत्रापैकी ६७ टक्के क्षेत्र पावसावर आधारीत (कोरडवाहू) शेतीचे आहे. शेतीमधील एकूण अन्नधान्य उत्पादनातील याचा वाटा ४४ टक्के आहे. भारताची ४० टक्के लोकसंख्या व ६५ टक्के पशुधन यावर अवलंबून आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा हाही पाण्याच्या उपलब्धीवर ठरतो. तो कमी असल्यामुळे १९६१ मध्ये ५७ टक्के, तर १९८७-८८ मध्ये ३५ टक्के आणि २००२ मध्ये आणखी घसरून २२ टक्के वर आला होता. सद्यःस्थितीत तो आणखी कमी झाला आहे. सन १९५१ मध्ये शेतीचा एकूण भारतीय सकल उत्पादनातील वाटा ५६ टक्के होता. तो २७ टक्के कमी होऊन सन २००१-०२ मध्ये २५ टक्क्यांवर आला. तर सन २००१ च्या जनगणनेनुसार एकूण कामगाराच्या जवळपास ६० टक्के कामगार हे शेतीत राबणारे होते, असा अहवाल ‘सुसाइड ऑफ फार्मर्स इन महाराष्ट्र’ हा श्रीजीत मिश्रा यांनी सन २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. निसर्गतः: उपलब्ध असणारे पाणी (आकृती २) जपण्यासाठी स्वतः जागृत राहण्याची व एकूणच समाजाची जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणात बदलाची प्रक्रिया वेगाने घडत आहे. प्रामुख्याने तापमान, कार्बन डायऑक्साइडचे वाढते प्रमाण, मुसळधार पावसांच्या घटना व वादळांच्या संख्येत वाढ, बर्फ वितळण्याचे वाढते प्रमाण या टोकाच्या बाबी दिसत आहेत. त्याबरोबरच पर्जन्य दिवसात घट आणि बाष्पोत्सर्जनातील वाढ ही जागतिक आणि भारतीय स्तरावर दिसून येत आहे. हे बदल मानवासाठी हानिकारक असल्याचे आता सर्वमान्यच झाले आहे. गतवर्षी एकाचवेळी काही भागांत पूर तर दुसरीकडे दुष्काळ, हे चित्र भारतात पाहायला मिळाले. कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तापी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती तर गोदावरीच्या खोऱ्यात, विदर्भात दुष्काळ ही महाराष्ट्राची स्थिती झाली होती. हे हवामान बदलाचे अपत्य मानायला हरकत नाही. जागतिक तापमानातील वाढ
पाण्याची उपलब्धी कमी झाल्यामुळे मानवी जीवनास प्रामुख्याने खालील संकटाचा सामना करावा लागतो.
दुष्काळाचे विश्लेषण, विवरण आणि अनुमानानंतर समायोजन किंवा उपाययोजना
पिकातील पाणी बचत
संपर्क- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (साहाय्यक प्राध्यापक (कृषिहवामानशास्त्र), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.