कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात टोमॅटोची आवक वाढलेलीच राहिली. दररोज दोन ते तीन हजार कॅरेटची आवक झाली. सांगली जिल्ह्यारबरोबरच बेळगाव सीमाभागातूनही आवक वाढत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
टोमॅटोस दहा किलोस ५० ते १२० रुपये दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून हवामान चांगले असल्याने टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. कांद्याची दररोज आठ ते नऊ हजार पोत्यांची आवक होती. त्यास दहा किलोस २०० ते १५०० रुपये दर होता. वांग्याची चारशे ते पाचशे करंड्या आवक झाली. त्यांना दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची सहाशे ते सातशे पोती आवक, तर दर दहा किलोस १०० ते ३०० रुपये मिळाला.
कारल्यांची दररोज शंभर ते दोनशे पोती आवक होती. त्यांना दहा किलोस १८० ते २५० रुपये दर होता. भेंडीची दीडशे ते दोनशे करंड्या आवक होती. त्यांना दहा किलोस १०० ते ३४० रुपये दर होता. मका कणसाची दोन ते तीन हजार नग आवक झाली. त्यांना शेकडा ५०० ते ६०० रुपये दर होता.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज पंधरा ते वीस हजार पेंढ्या आवक झाली. तिला शेकडा १००० ते १८०० रुपये दर होता. मेथीची दररोज तीस ते पस्तीस हजार पेंढ्या आवक झाली. तिला शेकडा ४०० ते ७०० रुपये दर होता. पालक, पोकळा, शेपूची दीड ते दोन हजार पेंढ्या आवक झाली. या भाज्यांना शेकडा ३०० ते ४०० रुपये दर होता. बोरांची ३० ते ४० पोती आवक झाली. त्यांना किलोस १० ते २० रुपये दर मिळाला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.