सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ

सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ

सातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी, माॅन्सूनपूर्व शेतीचा मोठे नुकसान झाले असले तरी भूर्गभातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात माण तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यात पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर सर्वाधिक भूजल पातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी तालुक्‍यांत भूजल पातळीत सुधारणा झाल्याने टंचाई कमी होणार आहे. 

जिल्ह्यातील ११ तालुक्‍यांत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सप्टेंबरअखेर पडलेल्या पावसामुळे झालेले पुनर्भरण व उपसा यांचा अभ्यास करण्यासाठी १०६ निरीक्षण विहिरींची पाहणी करण्यात आली. यामध्ये ८६ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून २० विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे. 

माण तालुक्यात मात्र अल्प प्रमाणात म्हणजे ०.०६ मीटर घट झाली आहे. इतर सर्व तालुक्यात वाढ झाली आहे. यामध्ये जावळी - ०.८४ मीटर, कऱ्हाड- ०.३७, खंडाळा- ०.३६, खटाव-१.९९, कोरेगाव- १.७२, महाबळेश्‍वर -२.७६, पाटण- ०.३४, फलटण -०.०८, सातारा-०.३५, वाई- १.८१ मीटर वाढ झाली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या जलसंधारणाच्या कामाचा उपयोग भूजल पातळीत वाढ होण्यास झाली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून सप्टेंबरअखेर हे सर्वेक्षण केले आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात दुष्काळी तालुक्यासह सर्वच तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. 

माण, खटाव तालुक्यांत बहुतांशी तलाव तसेच नद्या दुधडी भरून वाहू लागले आहे. अतिपावसाने शेतीचे नुकसान झाले असलेतरी भूर्गभात पाणी पातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात जाणवणारी भीषण पाणीटंचाई किमान या वर्षी तरी कमी प्रमाणात जाणवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com