बदलत्या हवामानाचा गव्हाला फटका

उष्णता वाढल्याने गव्हातील दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली
उष्णता वाढल्याने गव्हातील दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली

अमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची स्थिती यंदा चांगली वाटत होती. रब्बी वाढल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडीची गरज असते. मात्र, उष्णता वाढल्याने दाणे परिपक्व होण्याची प्रक्रिया मंदावली असून, शेतकरी चिंतित आहेत. बदलत्या हवामानाचा फटका बसत असून, कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.  सध्या किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. कमाल तापमानही  ३२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मागील हंगामात ज्वारी, मका व बाजरी या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे शेतकरी हे पीक सोडून दुसऱ्या पिकांकडे वळल्याने त्यात त्यांचा वेळ व पैसा मोठया प्रमाणात वाया गेला. यामुळे या शेतकऱ्यांनी गहू या पिकाला पसंती दिली.  साधारणतः दिवाळीनंतर गहू पिकाची पेरणी करतात. मात्र, या वर्षी पाऊस लांबला. खरिपातील पिके काढून मशागत व पुढे रब्बीच्या पेरणीला उशीर झाला. जानेवारीपर्यंत गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. हा गहू उशिराचा असून, त्याला थंडी आणखी हवी आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com