चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत वाढ

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत वाढ
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत वाढ

चंद्रपूर : शेतकरी आत्महत्यांच्या नियंत्रणासाठी विविध उपक्रमांवर भर दिला गेला असल्याचे एकीकडे सांगितले जात आहे. त्याच वेळी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात तब्बल ७६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २००१ ते २०१८ या कालावधीत घडलेल्या या आत्महत्यांमधील मदतीसाठी आलेली २४७ प्रकरणे फेटाळण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. 

दुष्काळ, कर्जबाजारीपणामुळे विदर्भातील कोरडवाहू पट्ट्यात नैराश्‍याचे वातावरण आहे. बॅंकांकडून थकीत कर्जामुळे नवीन कर्जासाठी उभे केले जात नाही. परिणामी सावकारांच्या दाराशी शेतकऱ्यांना जावे लागते. त्यानंतर चक्रव्यूहात फसलेल्या या शेतकऱ्यांचे खासगी सावकारांकडून शोषण सुरू होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग पत्करला आहे. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गृह जिल्हा असलेल्या चंद्रपूरमध्ये २००१ ते २०१८ या कालावधीत ७६४ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यातील ५१७ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. २४७ प्रकरणे फेटाळण्यात आली. पात्र ठरलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आजवर ५ कोटी १७ लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आत्महत्यांची ११ प्रकरणे फेर चौकशीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हा समितीने अपात्र ठरविलेल्या आत्महत्यांचा आकडादेखील मोठा आहे. शेतकरी आत्महत्या म्हणून कोणताही सबळ पुरावा कुटुंबीय सादर करू शकले नाही. त्यामध्ये शेतकऱ्यावर बॅंकांचे कर्ज नसणे, वैद्यकीय अहवालातून आत्महत्या सिद्ध न होणे, यांसह इतर कारणांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१६ या वर्षात सर्वाधिक ८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ५२  प्रकरणे पात्र, तर २५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com