जायकवाडी धरतातून विसर्ग वाढविला

जायकवाडी धरतातून विसर्ग वाढविला
जायकवाडी धरतातून विसर्ग वाढविला

जायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पात नांदूर मध्यमेश्‍वर प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे पाणी जसेच्या तसे गोदावरी पात्रासह वीज केंद्र, डावा, उजवा कालव्याच्या माध्यमातून सोडणे सुरू आहे. 

नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्‍वरमधून जायकवाडीच्या दिशेन पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आधीच जायकवाडी प्रकल्प तुडुंब भरला आहे. बुधवारी (ता. २५) प्रकल्पाची यंत्रणा व प्रशासनाच्या समन्वयातून जायकवाडीमधून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची सुरवात केली गेली. बुधवारी दहा दरवाजे व नंतर गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंत १६ दरवाजे दोन फुटांनी उघडून जवळपास ३५ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. 

प्रशासनाने होणारा पाण्याचा विसर्ग पाहता गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शुक्रवारी (ता. २७) दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असलेला विसर्ग ५०३०४ क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. याशिवाय जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून ९०० क्‍युसेकने, तर डाव्या कालव्यातून ७०० क्‍युसेकने, तसेच वीज केंद्रातून १५८९ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता.

शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास जायकवाडीत ५३४९३ क्‍युसेकने पाण्याची आवक होती. तेवढ्याच प्रमाणात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करून तुडुंब असलेली जायकवाडीची पातळी कायम राखली गेल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com