खानदेशात पाणीटचांईत दिवसेंदिवस वाढ

खानदेशात पाणीटचांईत दिवसेंदिवस वाढ
खानदेशात पाणीटचांईत दिवसेंदिवस वाढ

जळगाव : खानदेशात टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे निधीची अडचण आहे. नव्या वर्षात निधी मंजूर नाही. शिल्लक निधी खर्च करण्याचा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला अधिकार प्राप्त झालेला नसल्याची माहिती मिळाली. यातच टंचाई स्थिती दिवसेंदिवस वाढत असून, याचा परिणाम उपाययोजना राबविण्यावर होत असल्याची ओरड गावोगावी वाढली आहे. 

जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाची जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर मोठी जबाबदारी आहे. परंतु नवीन वर्षात निधीची प्रतीक्षा असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यात २८ गावांमध्ये ४८ टॅंकर सुरू आहेत. धुळ्यातही सुमारे १८ गावांमध्ये टंचाईस्थिती तीव्र असून, १४ टॅंकर सुरू आहेत. नंदुरबारातही टॅंकरची संख्या १० वर पोचली आहे. टॅंकरग्रस्त गावांव्यतिरिक्त अनेक ठिकाणी दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशा गावांमधून तात्पुरत्या उपाययोजनांसाठी मागणी केली जात आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेकडे असे प्रस्ताव आले आहेत. परंतु तांत्रिक बाबींमुळे या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन निधी खर्च करणे शक्‍य होत नसून, उपाययोजनांमध्ये अडचणी येत आहेत. 

कामे रखडली जळगाव जिल्ह्यात काही टॅंकरना डिझेलसाठी निधी पुरविणेही शक्‍य नसल्याचे अलीकडेच समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत निधी आहे, परंतु त्यासंबंधी तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. नळ दुरुस्ती, कूपनलिका तयार करणे, विहिरींचे खोलीकरण व विहिरींचे अधिग्रहण यासंबंधीची कामे रखडली आहेत. अशीच स्थिती राहिली तर टॅंकर बंद होतील. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील पाणीपुरवठासंबंधी मागणी प्रस्तावांची संख्या वाढून त्याबाबतचा दबाव वाढेल, तक्रारी येतील, असेही सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com