औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाबी बोंड अळी कपाशी पिकात पुन्हा डोके वर काढत आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही प्रमाणात आढळून आलेल्या या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
यंदा मराठवाड्यात कपाशी पिकाची लागवड दोन, तीन टप्यात झाली. कपाशी सध्या चांगली वाढली आहे. तिला बऱ्यापैकी बोंडे व पाते आहेत. लवकर लावलेल्या कपाशीवर सुरवातीच्या काळात जुलैमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर नियंत्रित झाली. जालना जिल्ह्यात काही ठिकाणी आता पुन्हा शेतकऱ्यांनी कपाशी पिकांमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यात अळीचे ७ ते १० पतंग प्रतिसापळ्यात आढळून आले आहेत. शिवाय तयार २५ टक्के बोंडात गुलाबी बोंड अळी आढळून आली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क राहून आर्थिक नुकसानीची पातळी पाहून योग्य वेळी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
हे करा...
कामगंध सापळ्याचा प्रयोग उपयोगी
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालनाअंतर्गत वानडगाव व वखारी येथे प्रतिएकरी १६ कामगंद सापळे लावून गुलाबी बोंड अळीचे पतंग पकडण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पतंग पकडल्यामुळे बोंडामध्ये गुलाबी बोंड अळी आढळून आली नाही. त्यामुळे अळीच्या नियंत्रणासाठी सापळ्यांद्वारे पतंगांचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
गुलाबी बोंड आळीचे प्रमाण कमी दिसत असले, तरी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये. कपाशीच्या बोंडांचे, सापळ्यात अडकलेल्या पतंगांचे निरीक्षण करून तात्काळ उपाययोजना करा, फरदड घेणे टाळा. - अजय मिटकरी, किटकशास्त्रज्ञ, केव्हीके खरपुडी जालना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.