शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल : रिझर्व्ह बॅंक

शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल : रिझर्व्ह बॅंक
शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास महागाई वाढेल : रिझर्व्ह बॅंक

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने २०१८-१९ चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. परंतु शेतमालास दीडपट हमीभाव दिल्यास त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊन महागाई वाढेल, अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) वर्तविली आहे.  भारतीय रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ५) वर्ष २०१८-१९ साठीचे पहिले आर्थिक धोरण जाहीर केले. या वेळी ‘‘सरकारने शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केल्यानंतर नवीन सूत्र पुढे आणले. नवीन सूत्रानुसार शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी केलेल्या खर्चाचा व्यापकपणे समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हमीभावात वाढ होऊन देशात महागाई वाढले,’’ असे आरबीआयने म्हटले आहे.  ‘‘मॉन्सूच्या हंगामात जर पावसाची तूट निर्माण झाली तर त्याचा परिणाम देशातील अन्नधान्य उत्पादनावर होईल. 

सरकारने जर दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली तर अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील. बाजारात आवक कमी होऊन दर गगनाला भिडतील त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होईल. कमाल महागाई दर हा किमान महागाई दारपेक्षा किमान ८० पॉईंटने वाढेल. तरीही या स्थितीबाबत सध्या पूर्ण माहिती उपलब्ध नसल्याने योग्य ते भाकीत वर्तविणे शक्य नाही,’’ असेही आरबीआयने म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com