फळबांगांच्या नुकसानीचे पंचनामे होता होईनात : शेतकऱ्यांच्या तक्रारी

crop insurance
crop insurance

औरंगाबाद: अवेळी पडेलेला पाऊस व धुक्‍यामुळे फळबांगांचे नुकसान झाले. त्याबाबत निवेदन देऊनही झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले नसल्याची तक्रार औरंगाबाद तालुक्‍यातील फळबागधारकांनी केली आहे. मागण्यांसदर्भात मंगळवारी (ता. २४) औरंगाबाद तालुक्‍यातील चित्तेपिंपळगाव, करमाड, लाडसावंगी, येथील शेकडो शेतकऱ्यांनी थेट कृषी, महसूल कार्यालयावर धडक दिली.  मंगळवारी (ता. २४) या संदर्भात तालुका कृषी कार्यालयासह तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले. शिवाय प्रश्‍नांची सरबत्तीही करण्यात आली. फळबागधारकांच्या निवेदनानुसार अवेळी पाऊस व धुक्‍यांमुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईचे अनुदान देण्याची मागणी वारंवार निवेदन देऊन करण्यात आली. परंतु, नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाही. फळबागधारकांना नुकसानीच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यासाठी असे करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी तत्काळ लक्ष घालून द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व इतर फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानीपोटी अनुदान देण्याची मागणी फळबागधारक शेतकऱ्यांनी केली आहे. यामध्ये पिंप्रीराजा, टाकळी माळी, दरकवाडी, अडगाव, डायगव्हाण, घारेगाव यांसह इतर गावातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com