पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाही अशी तंबी दिली आहे.
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा Instructions of Marketing Directorate Strictly implement
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा Instructions of Marketing Directorate Strictly implement

नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाही अशी तंबी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जिल्हयातील सर्व बाजार समित्यांना आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या सुट्टयांबाबत ३० एप्रिल २०२१ पर्यंत मान्यता घ्यावी. तसेच पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,अशा सूचना जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात विविध कारणांनी दहा दिवस बाजार समितीत कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होण्यासह दरातही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता बाजार समित्यांनी घेणे आवश्यक आहे, असल्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी  सांगितले आहे. बाजार समितीने वर्षाच्या सुरुवातीलाच साप्ताहिक व इतर सुट्ट्यांचे वर्षभराचे दिवस, कालावधी, पुरेसा वेळ  व कामकाजाचे आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करुन त्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची ३१ मार्च पूर्वी मान्यता घ्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.

बाजार समिती बंद असण्याचे दिवस वगळून अचानक काही कारणासाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्यास, त्या बाबत पूर्वसूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात. अशा प्रकारे बाजार अचानक बंद ठेवावा लागणार असला तरी सलग तीन पेक्षा जास्त दिवसासाठी बाजार बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी. याप्रमाणे शेतमाल खरेदी विक्री सौदे चालू किंवा बंद ठेवण्याचे केलेल्या नियोजनाचे पालन काटेकोरपणे होईल असे पहावे, असे स्पष्ट केले आहे. 

अन्यथा बाजार समित्यांवर कारवाई करा व्यापाऱ्यांचे वैयक्तिक कारण असेल तर संबंधित व्यापारी सुट्टी घेऊ शकेल, परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्व व्यापारी एकाच दिवशी शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवणार नाहीत. सुट्टीच्या दिवसा व्यतिरिक्त इतर दिवशी व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवल्यास, अशा व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमयन) अधिनियम,१९६३ व १९६७ मधील तरतुदीनुसार बाजार समितीने त्वरित कारवाई करावी. तसेच बाजार चालू राहील यासाठी पर्यायी व्यवस्था बाजार समितीने करावी, असे पत्रात नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com