उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २१ लाख ६ हजार हेक्टरवरील खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा संरक्षण घेण्यासाठी ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ३९ लाख १९ हजार अर्ज सादर केले. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख २९ हजार या सर्वाधिक अर्जासह उस्मानाबादमधील ९ लाख ४८ हजार, नांदेडमधील ९ लाख ४६ हजार, परभणीतील ६ लाख ९४ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ९२ हजार अर्जांचा समावेश होता. या अर्जांद्वारे २१ लाख ६ हजार हेक्टरवरील पिकांना शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे.
विमा संरक्षित क्षेत्रांमध्ये लातूर जिल्ह्यातील ५ लाख ७५ हजार हेक्टरसह, उस्मानाबाद ५ लाख १८ हजार, नांदेड ५ लाख, परभणी ३ लाख ७२ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. विमा संरक्षित क्षेत्रासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४८ कोटी ५६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४१ कोटी ८५ लाख, नांदेड ४४ कोटी २ लाख, परभणी ३२ कोटी ३८ लाख, तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ कोटी ४५ लाख रुपये १७९ कोटी २६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
विम्यापासून ६ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र दूर
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षनाविना आहेत. जुलै अखेरच्या अहवालानुसार लातूर विभागात २७ लाख ९४ हजार ६७० हेक्टरवर प्रत्यक्षात खरिपाची पेरणी झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.