विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे कंपन्यांना निर्देश

विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे कंपन्यांना निर्देश
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे कंपन्यांना निर्देश

नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमधील विमाधारकांच्या दाव्यांचा तातडीने निपटारा करण्याची सूचना केंद्रीय अर्थमंत्रालयाने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान पीक विमा योजना अशा विविध विमा योजनांच्या अंतर्गत विमा धारकांनी केलेले दावे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश अर्थमंत्रालयाने आयआरडीएआयच्या माध्यमातून विमा कंपन्यांना दिले आहेत. मुसळधार पावसाने देशाच्या अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. पूरस्थितीमुळे अनेक राज्यांमध्ये हाहाकार उडाला असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. अद्यापही देशातील काही राज्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विमा नियंत्रक असलेल्या आयआरडीएआयकडून विमा कंपन्यांना निर्देश जारी करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे विमाधारकांनी केलेले दाव्यांची नोंदणी करून त्यातील पात्र दावे तातडीने निकाली काढावेत, असे आयआरडीएआयने म्हटले आहे. मृतदेह न आढळल्यामुळे अनेकदा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये चेन्नईत २०१५ मध्ये आलेल्या पुरावेळी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचे पालन करावे, अशी सूचना आयआरडीएआयकडून करण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दर आठवड्याला किती विमा दावे निकाली काढण्यात आले याची राज्यनिहाय माहिती आयआरडीएआयकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com