अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरे थंडावली 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामाचे नियोजन कोलमडले आहे.
अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरे थंडावली 

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामाचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळघरांना बसला असून, त्यांची धुराडी थंडावली आहेत. साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने होत नाहीत तोच अवकाळी बरसल्याने ऊसतोडणीही मंदावल्या आहेत. 

सोमवारी (ता.४) पाऊस झाल्यानंतर बुधवारी सायंकाळीही गूळ उत्पादक भागात पाऊस झाला. गुऱ्हाळघरांसाठी लागणारे जळण पूर्णपणे भिजल्याने गुऱ्हाळमालक हतबल झाले आहेत. जळण नसल्याने गुऱ्हाळे काही दिवस बंद ठेवावी लागणार आहेत. अनेक गुऱ्हाळघरांवर गाळपासाठी आणलेला ऊस पडून आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांनी गती घेतली होती. मात्र अवकाळीमुळे झटका बसला आहे 

पावसामुळे वाफसा येत नसल्याने ऊसतोडणीही अडखळत सुरू आहे. ऊस भरलेली वाहने शेतात अडकण्याचा धोका असल्याने सखल भागातील ऊसतोडणी रखडली आहे. दिवसभर ढगाळ हवामान व सायंकाळी पावसाची शक्यता ऊसतोडणीला व्यत्यय निर्माण करीत आहे.  प्रतिक्रिया पावसामुळे गुऱ्हाळघरे किमान चार, पाच दिवस बंद ठेवावी लागणार आहेत. आधीच गुळाला दर नसताना हंगाम कसा पूर्ण करायचा असा प्रश्‍न आहे. त्यात अवकाळी पावसाने नुकसानीत भर घातली आहे. खराब हवामानामुळे गाळप केलेल्या गुळाला पाणी सुटण्याची भीती आहे.  - जयदीप पाटील, गुऱ्हाळघर मालक, वडणगे 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com