जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावे

जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावे
जळगाव जिल्ह्यात ३६९ टंचाईग्रस्त गावे

जळगाव  ः जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस झाल्याने टंचाई जाणवणार नसल्याची चिन्हे होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी केवळ १३ गावांत टंचाईसाठी १३ लाखांची तरतूद झाली. मात्र, आता टंचाईग्रस्त गावांची संख्या १३ वरून ३६९ वर गेली आहे. तर टंचाई कृती आराखडा तब्बल २ कोटी ३६ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये ४०४ योजना राबविल्या जाणार आहेत.  एप्रिल ते जून या कालावधीत जाणवणाऱ्या संभाव्य टंचाईसंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. हा आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरी १३८ टक्के पाऊस झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा अहवाल दिला होता.  मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार पुन्हा सर्वेक्षण करून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. सुरुवातीला अवघ्या १३ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या १३ गावांसाठी १३ लाख ८० हजार रुपये रकमेचा आराखडा तयार करण्यात आला. तो जिल्हा प्रशासनाला सादरही करण्यात आला होता.  मात्र, त्यात दुरुस्त्या सुचविण्यात येऊन तो जिल्हा परिषदेकडे परत पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेने आज सुधारित आराखडा सादर केला असून, हा आराखडा तब्बल २ कोटी ३६ लाखांनी वाढला आहे.  असा आहे आराखडा  सुधारित आराखड्यात संभाव्य पाणीटंचाईच्या गावांची संख्या वाढली असून, आता ३७९ गावांमध्ये ४०४ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हा आराखडा आता २ कोटी ५० लाख ६० हजार रुपये इतक्‍या रकमेचा झाला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत संभाव्य टंचाई भासणाऱ्या गावांमध्ये या योजना राबविल्या जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com