जळगाव तालुक्‍यात पीक विम्याच्या परताव्याची प्रतिक्षाच..!

जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदर रकमा शेतकऱ्यांना तातडीने विमा कंपनीने द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत.
In Jalgaon taluka, crop insurance returns are not received
In Jalgaon taluka, crop insurance returns are not received

जळगाव : तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदर रकमा शेतकऱ्यांना तातडीने विमा कंपनीने द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी करीत आहेत. 

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिपावसामुळे पिकांचे नुकसान झालेले होते. शासनाच्या आदेशान्वये या नुकसानीचा पंचनामा देखील त्यावेळी तलाठी, कृषी विभाग यांनी केलेला आहे. मागील वित्तीय वर्षात खररिपासंबंधी केंद्राच्या योजनेतून सुमारे ८० हजार शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यासंदर्भात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी प्रशासन आणि कृषी विभागाकडे मागणी केली. विमा कंपन्यांशीदेखील संपर्क केला. त्या वेळेस कृषी आणि महसुली कर्मचाऱ्यांचे पंचनामे गृहीत धरून नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु परताने मिळालेले नाहीत. शेतकरी सध्या अनेक समस्यांमुळे अडचणीत आहेत. अशा वेळेस मदनिधी, अडकलेले पैसे त्यांना तातडीने मिळायला हवेत, अशी मागणी शेतकरी संजय पाटील (चोपडा) यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com