'गिरणा'तील साठ्यामुळे जळगावचा पाणीप्रश्न मिटणार

'गिरणा'तील साठ्यामुळे जळगावचा पाणीप्रश्न मिटणार
'गिरणा'तील साठ्यामुळे जळगावचा पाणीप्रश्न मिटणार

जळगाव : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पाऊस नाही. काही भागातील तुरळक, हलका पाऊस वगळता जोरदार पाऊस कुठेही झालेला नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील गिरणा नदीवरील गिरणा धरण ४६ टक्के भरले आहे. त्यातील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. ते लवकरच ५० टक्‍क्‍यांपर्यंत जाईल. तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकचे हतनूर धरण ४९ टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील वर्षीचा पिण्याच्या पाण्याचा आणि दोन आवर्तनाचा प्रश्न मिटेल, असे सांगण्यात आले.

गिरणा धरणात मागील आठवड्यात फक्त ३० टक्केच साठा होता. हे सर्वात मोठे धरण असून, त्याचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल आदी तालुक्‍यांना लाभ होतो. हतनूरचे चार दरवाजे उघडे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याचे ३६ दरवाजे उघडे होते. ते एकामागून एक असे बंद करण्यात आले. 

वाघूर नदीवरील जामनेर व जळगाव तालुक्‍यानजीकचे वाघूर धरण ४९.६१ टक्के भरले आहे. त्यात अजूनही कमी प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत आहे. पाचोरा, पारोळा, एरंडोल, चाळीसगाव भागातील बहुळा, मन्याड, भोकरबारी, अंजनी हे प्रकल्प कोरडेच आहेत. तोंडापूर प्रकल्पातील साठा काहीसा वाढला आहे.

रावेर तालुक्‍यातील मंगरूळ व सुकी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अभोरा प्रकल्प ९४.४४ टक्के भरला आहे. धुळे व जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍याला उपयोगी ठरणारे अनेर धरण ५६.८७ टक्के भरले आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पही भरत आहे. गिरणा नदीला या आठवड्याच्या सुरवातीला प्रवाही पाणी आले होते. हा प्रवाह कमी झाला आहे. तापी नदीमध्ये मात्र चांगले प्रवाही पाणी सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com