परतूर, जि. जालना : शहरासह परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल, या धास्तीने सध्या शेत-शिवारात खळ्यांची लगबग दिसून येत आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरबरा, करडई, ज्वारी इतर पिके आता काढणीला आली आहेत. शेतकरी पिके काढणीच्या तयारीत आहेत. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.
तालुक्याच्या दैठणा, येणोरा, पाटोदासह इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे हिरावली जातील, या धास्तीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वेळप्रसंगी जादा मजूर कामाला लावून खळे लवकर आटोपून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
द्राक्ष बागांना धोका
तालुक्यातील अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेतात. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा द्राक्ष बागेवर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची चिंतादेखील वाढली आहे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.