दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा : आदित्य ठाकरे

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे

सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा सुजलाम सुफलाम नवा महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातून श्री. ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्याला प्रारंभ झाला. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, विक्रांत सावंत, जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती सुनील मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन शिरोडकर आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, की संघर्षाच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी अनेक हात उभे राहिले. त्यांचे आभार मानण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा आहे. प्रत्येक घरात पोचण्याचा आपला प्रयत्न आहे. येत्या काळात आपल्याला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो बेरोजगारीमुक्त, प्रदुषणमुक्त, कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असेल. सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचा आपला संकल्प आहे. त्यासाठी सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com