जवळार्जुन, नाझरेतील बंधारे पुरंदर उपसा योजनेतून भरले

जवळार्जुन, नाझरेतील बंधारे पुरंदर उपसा योजनेतून भरले
जवळार्जुन, नाझरेतील बंधारे पुरंदर उपसा योजनेतून भरले

जेजुरी, जि. पुणे : बागायती गावे म्हणून ओळख असलेल्या नाझरे व जवळार्जुन या दोन गावांचा दुष्काळाशी सध्या संघर्ष सुरू आहे. दुष्काळातील पिके जगविण्यासाठी पुरंदर उपसा योजनेचे पाणी कऱ्हा नदीत सोडून नदीतील बंधारे भरून घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून नदीवरील बंधारे भरून घेत पिकांना जगविण्यात सध्या तरी त्यांना यश येत आहे. 

जवळार्जुन व नाझरे ही गावे नाझरे धरणातील कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये येतात. मात्र धरणातील पाणी यंदा पिण्यासाठी राखून ठेवल्याने कालव्याद्वारे हिवाळी आवर्तन झालेच नाही. ऊस पिकवणारी ही दोन गावे अडचणीत आली. लागवड केलेला ऊस जगविण्यासाठी आटापिटा सुरू झाला. या दोन गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘पुरंदर’चे पाणी कऱ्हा नदीत सोडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com