जयंत पाटील
जयंत पाटील

शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय ः जयंत पाटील

मुंबई  ः पीकविम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. शिवसेनेमार्फत बुधवारी (ता.१७) जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. राज्यातील शेतकरी कुठे होते, असा सवालही श्री. पाटील यांनी केला आहे. 

श्री. पाटील म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्‍न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com