समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक लढविणार : जयंत पाटील

जयंत पाटील
जयंत पाटील

भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद व संघटनात्मक बांधणीसाठी १५ ऑगस्टपासून सेवाग्राम येथून राज्यव्यापी दौऱ्याची सुरवात करण्यात आली. या दौऱ्याअंतर्गत त्यांनी भंडारा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री अनिल देशमुख, नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत विकासात्मक कोणत्याच योजना राबविण्यात आल्या नाही. उद्योग उभारले गेले नाही, परिणामी या भागात बेरोजगारी वाढीस लागली आहे. भंडारा येथे भेल प्रकल्पदेखील भाजपने येऊ दिला नाही. सिंचन प्रकल्पांना गती दिली नाही. या जिल्ह्यावर भाजपचा इतका आकस असण्याचे कारण काय  असा प्रश्‍न त्यांनी या वेळी उपस्थित केला.

वर्धा आणि चंद्रपूर या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारूचा सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे निर्माण करण्याचे यश या सरकारच्या खात्यावर जमा झाले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर देखील त्यांनी या वेळी टीका केली.  देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून आज एक डॉलर ७० रुपये २२ पैशांपर्यंत पोचला आहे. राज्यातील मराठा, धनगर, ओबीसींचे प्रश्‍न कायम आहेत. राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली; त्या प्रकरणात आजवर कोणालाच अटक झाली नाही, हा चिंतेचा विषय असल्याचे देखील ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com