जायगाव होणार सीताफळांचे गाव

सीताफळ
सीताफळ

सातारा  : जायगाव (ता. कोरेगाव) या दुष्काळी गावाची पाणीदार गाव म्हणून ओळख झाली आहे. आता सीताफळाचे गाव म्हणून ते ओळखले जाणार आहे. जायगावच्या डोंगररांगांत आणि शिवारात गावातील रोपवाटिकेत तयार केलेल्या एक लाख सीताफळांची रोपे लावण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे. नुकतेच जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते सीताफळाच्या रोप लागवडीस प्रारंभ केला.

तहसीलदार स्मिता पवार, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे; तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक, ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. जायगावातील ५० जोडप्यांची अभ्यासासाठी ‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत सीताफळासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्‍यातील सीताफळ उत्पादक गाव आणि प्रक्रिया केंद्राची पाहणी करण्यासाठी सहल गेली होती. त्यानंतर संपूर्ण गावात सीताफळांची रोपे लावण्याचा निर्णय झाला.

सध्या २०० एकरावर सीताफळ लागवडीची  कार्यवाही सुरू आहे. आपल्या गावात सिंचनाचे उत्तम काम झाले आहे. त्यामुळे हे पाणी शाश्वत राखण्यासाठी १००  टक्के ठिबक तर कराच; पण ग्रामसभा घेऊन कोणकोणती पिके घ्यावीत हेही ठरवा, तरच हे पाणी शाश्वत राहील; अन्यथा जास्त पाणी लागणारे पीक घेतल्यास पुन्हा तुम्हाला मागचे दिवस दाखवतील, अशी सूचना श्रीमती सिंघल यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com