रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी : ज्योतिरादित्य सिंदिया

ज्योतिरादित्य सिंदिया
ज्योतिरादित्य सिंदिया

कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन हजारांहून अधिक उद्योग बंद पडले. तरुण बेरोजगार होत आहेत. नव्याने रोजगार निर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता. १८) आयोजित ‘यूथ कनेक्ट’ उपक्रमात ते बोलत होते. या वेळी कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी निवडणुकीसाठी तयार केलेल्या ‘मिशन रोजगार’ जाहीरनाम्याचे त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. आमदार सतेज पाटील, संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, बाजीराव खाडे या वेळी उपस्थित होते.

या वेळी ते म्हणाले, की केंद्र शासनाने अनेक धोरणे आखली, परंतू ती फसली. त्याचा फटका देशातील युवकांना बसला. या फसलेल्या धोरणांमुळे कोट्यवधी तरुणांना भवितव्याची चिंता आहे. नोकऱ्यांची नवीन संधी निर्माण करणारे सरकार आपल्याला हवे आहे. असे सरकार आणणे हे सगळे तुमच्या हातात आहे, तुम्ही सध्याच्या शासनाच्या विरोधात जाऊन सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन श्री. सिंधिया यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com