'कोयना'तून कर्नाटकला २.९५ टीएमसी पाणी

'कोयना'तून कर्नाटकला २.९५ टीएमसी पाणी
'कोयना'तून कर्नाटकला २.९५ टीएमसी पाणी

कोयनानगर, जि. सातारा : कर्नाटकात पडलेल्या दुष्काळामुळे पाणीटंचाईची परस्थिती निवारण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे, या कर्नाटक सरकारच्या मागणीनंतर महाराष्ट्र व कर्नाटक राज्य शासनादरम्यान जलसामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या विमोचक्र दरवाजा उघडून धरणातून कालअखेर कर्नाटकसाठी २.९५ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला.

कर्नाटक राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तेथील परस्थिती निवारण्यासाठी कोयना धरणातून चार टीएमसी पाणीसाठा सोडण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक सरकारने केली. कोयनेतून कर्नाटक राज्यासाठी पाणी सोडल्यावर अलमट्टी धरणातून महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परस्थिती निवारण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या दोन राज्यांतील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी या दोन्ही राज्यांतील शासनाने जलसामंजस्य करार केला.

या करारानुसार कोयना धरणातून कर्नाटक राज्यासाठी धरणाच्या विमोचक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटकसाठी कोयना धरणातून २.९५ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे. अजूनही दहा मे पर्यंत १.०५ टीएमसी पाणीसाठा दिला जाणार आहे.

धरणात २९.७७ टीएमसी पाणीसाठा

सिंचनासाठी आतापर्यंत कोयना धरणातून ३३.४२, तर वीज प्रकल्पासाठी ४९.८७ टीएमसी पाणीसाठा वापरण्यात आला आहे. धरणात सध्या २९.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. सिंचन व वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणातील पाणीसाठा खालवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com