आठ वर्षांनी भरला खानापूर-पोसेवाडी तलाव 

आठ वर्षांनी भरला खानापूर-पोसेवाडी तलाव 
आठ वर्षांनी भरला खानापूर-पोसेवाडी तलाव 

सांगली ः खानापूर तालुक्यासह अनेक गावांना जीवनदायी असलेला खानापूर-पोसेवाडी तलाव टेंभू योजनेच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून धबधब्यासारखे पाणी बाहेर पडत आहे. तब्बल आठ वर्षांनी तलाव भरल्याने गणपती उत्सवात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

खानापूर तालुक्यात दोन वर्षांपासून पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली. तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून दुष्काळी पट्ट्यातील शेतीची तहान भागविली जात होती; परंतु या योजनेचे पाणी खानापूर-पोसेवाडी तलावात सोडले जात नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपासून हा तलाव कोरडा होता. टेंभूच्या पाचव्या टप्पा पूर्ण करू आम्हाला पाणी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. 

दरम्यान, पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधींनी टेंभूच्या कामाला गती दिली. त्यामुळे पाचवा टप्पा पूर्ण झाला. त्याची चाचणी एप्रिल महिन्यात घेऊन हे पाणी खानापूर घाटमाथ्यावर आणले. त्यानंतर ही योजना बंद केली. पुन्हा योजना सुरू करून पाणी दुष्काळी पट्ट्यातील भागांना देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. त्यामुळे खानापूर तलावात टेंभूचे पाणी दाखल झाले. तलाव भरून पाणी सांडव्यातून पापनाशी ओढ्यातून सुलतानगादे साठवण तलावाच्या दिशेने निघाले. या आवर्तनात सुलतानगादे साठवण तलाव भरेल. 

दरम्यान, तलाव भरण्याच्या कालावधीत डॉ. उदय हजारे यांनी पाच लाख खर्च करून २१ दिवस पोकलेन चालवून तलावाचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम केले. बंधाऱ्याचे उखडलेले पिचिंग नव्याने करून तलावाला मजबुती आणली. त्यामुळे हा तलाव भरल्याने पाण्याचा प्रश्न सध्यातरी मार्गी लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com