खानदेशात पारा ३६ अंश सेल्सिअसवर

खानदेशात पारा ३६ अंश सेल्सिअसवर
खानदेशात पारा ३६ अंश सेल्सिअसवर

जळगाव ः उष्णता वाढत असून, रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मध्येच वीज बंद होत असल्याने सिंचनासंबंधी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. शेतकरी त्रस्त झाले असून, सिंचनासाठी पाण्याची गरज किंवा मागणी वाढली आहे.  गिरणा धरणातून आवर्तनाची मागणी नदीकाठचे शेतकरी करीत आहेत. नदीत पाणी हवे तसे सोडले नसल्याने कूपनलिकांचा जलसाठा कमी होत आहे. खानदेशात सध्या पांझरा, अनेर प्रकल्पातून धुळे जिल्ह्यात आवर्तन सोडले आहे. जळगाव जिल्ह्यात वाघूर प्रकल्पातून आवर्तन सुटलेले नाही. गिरणा धरणातून पाटात पाणी सोडले आहे. तर हतनूर प्रकल्पातूनही पाटचारीद्वारे चोपडा (जि. जळगाव) पर्यंत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे लाभक्षेत्रात सिंचनासाठी मदत होत आहे. उष्णता वाढत असल्याने हलक्‍या, मुरमाड भागात पाण्याची गरज वाढली आहे. पनलिका, विहिरींवर सिंचनासंबंधी अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची मात्र सिंचनासंबंधी धावपळ होत आहे. दिवसा फक्त चार दिवस वीज मिळते. तर दोन दिवस रात्री वीजपुरवठा केला जातो. दिवसा वीजपुरवठा सुरू असतो, तेव्हा चार ते पाच वेळेस वीजपुरवठा खंडित केला जातो. या अनियमित वीजपुरवठ्यामुळे कृषिपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यात पंप दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तीन ते चार हजार रुपये खर्च लागतो. खानदेशात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर किमान तापमानही २१ अंश सेल्सिअसवर आले आहे. तापमान पुढे आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. अशातच वीजपुरवठा सुरळीत नसल्याने रब्बी पिकांच्या सिंचनाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com