खरिपाचा आपत्कालीन पीक नियोजन आराखडा निश्चित : ज्ञानदेव वाकुरे

कोल्हापूर : ‘‘आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी आहे,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
 Kharif Emergency Crop Planning Plan Fixed: Dnyandev Wakure
Kharif Emergency Crop Planning Plan Fixed: Dnyandev Wakure

कोल्हापूर  : ‘‘आगामी खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मे महिन्याच्या तिसऱ्या ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी आहे,’’ असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले. 

या आराखड्यानुसार खरिपातील जिरायत पिकांसाठी जूनचा पहिला ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नागलीचा पेरणी कालावधी, जूनचा पहिला ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा सर्वसाधारण पेरणी कालावधी, तर जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा भुईमूग पेरणीचा सर्वसाधारण कालावधी निश्चित केला आहे. 

बागायत पिकांसाठी मे चौथा ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा पेरणी कालावधी आणि मे’चा तिसरा ते जूनचा पहिला आठवडा भातासाठी पेरणी कालावधी निश्चित केला आहे. सोयाबीन पिकाची सर्वसाधारण उगवण क्षमता ही ७० टक्के गृहित धरून प्रति एकरी ३० किलो बियाणे प्रमाण असते. तथापि, बियाणे संचालकांच्या सूचनेनुसार सोयाबीन पिकाची उगवण क्षमता ही ६५ टक्के गृहित धरून प्रति एकरी बियाणे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com