लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना खरीप विमा मंजूर

उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे.
Kharif insurance sanctioned to farmers on Rs 23 lakh
Kharif insurance sanctioned to farmers on Rs 23 lakh

उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मंजूर झाला आहे.

खरीप हंगाम २०१९-२० मध्ये या पाच जिल्ह्यातील ४६ लाख २ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख ८२ हजार, उस्मानाबाद ११ लाख ८६ हजार, नांदेड ११ लाख ९२ हजार, परभणी ८ लाख २१ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. २३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. 

लातूर जिल्ह्यातील ६ लाख १८ हजार हेक्टर, उस्मानाबाद ५ लाख ७६ हजार हेक्टर, नांदेड ५ लाख ७८ हजार हेक्टर, परभणी ४ लाख ३० हजार हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५० हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश होता. जवळपास ८ हजार ५८१ कोटी रुपये विमा संरक्षित रकमेसाठी १८४ कोटी रुपये विमा हप्ता भरला गेला होता.

प्राप्त माहितीनुसार,  पाच जिल्ह्यातील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना १९४६ कोटी रुपये विमा परतावा मंजूर आहे. विमा परताव्याची ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com