औरंगाबाद : खरिपासाठी ५३ हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज

येत्या खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे, खते, औषधे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह कृषी निविष्ठांची खरेदी करावी. - आनंद गंजेवार,कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद
खरिपासाठी ५३ हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज
खरिपासाठी ५३ हजार क्‍विंटल बियाण्यांची गरज

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामासाठी औरंगाबाद जिल्ह्यात विविध प्रकारच्या ५३ हजार ४०४ क्‍विंटल बियाण्यांची गरज असणार आहे. त्यापैकी ६ हजार ९७१ क्‍विंटल बियाण्यांचा पुरवठा महाबीज करणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ऊस वगळता ७ लाख ११ हजार १२२ हेक्‍टर क्षेत्र पेरणीसाठी नियोजित केले आहे. त्याच क्षेत्राचा विचार करता संकरीत ज्वारी, बाजरी, सुधारीत बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, भूईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, संकरीत कापूस, सुधारीत कापूस आदी बियाण्यांचे नियोजन व गरज कृषी विभागाने नोंदविली आहे. 

२०१६ ते २०१९ दरम्यान जिल्ह्यात सरासरी ४५ हजार १८६ क्‍विंटल बियाणे खरिपासाठी लागले आहे. त्यानुसार येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रासाठी ५३ हजार ४०४ क्‍विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यापैकी ४४ हजार ५३३ क्‍विंटल बियाणे खासगी क्षेत्रातून उपलब्ध होणार असून ६ हजार ९७१ क्‍विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करून देणार आहे.

सर्वाधिक क्षेत्रावर लागवड होणाऱ्या संकरीत कपाशीचे ११ हजार ३४० क्‍विंटल बियाणे खासगी कंपन्यांकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय महाबीजमार्फत ५० क्‍विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com