राज्यात खरीप पेरणी तीन टक्के

राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या तुलनेत तीन टक्के पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्यांना फारसा वेग येताना दिसत नाही. कापसाची लागवड सहा टक्के झाली आहे.
Kharif sowing in the state is three per cent
Kharif sowing in the state is three per cent

नगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या तुलनेत तीन टक्के पेरणी झाली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरण्यांना फारसा वेग येताना दिसत नाही. कापसाची लागवड सहा टक्के झाली आहे. तर सोयाबीनची पेरणी ही अल्पच आहे. यंदा आतापर्यंत ४ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालीय. तर गेल्या वर्षी आतापर्यंत ७ लाख ५३ हजार २१६ हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड झाली होती.

राज्यात खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज आहेत. सुरुवातीला बहुतांश भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला. मात्र मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर पावसाने उसंत दिली. काही भागांत अधून-मधून पाऊस पडत असला तरी अपवाद सोडला, तर बहुतांश भागात पेरणीलायक पाऊस झालेला नाही. त्यात कृषी विभागानेही किमान ९० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी, कापूस लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या, कापूस लागवड आठ दिवसांपासून थांबल्यासारखी झाली आहे. 

राज्यात खरिपाचे सरासरी १ कोटी ४१ लाख ९७ हजार ६२५ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक कापसाचे ४१ लाख ८३ हजार ८०१ हेक्टर, तर त्यापोठापाठ सोयाबीनचे ३८ लाख ८४ हजार ६३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या १५ जूनपर्यंत ७ लाख ५३ हजार हेक्टरवर पेरणी, कापूस लागवड झाली होती. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ३ लाख २० हजार हेक्टर कमी क्षेत्रावर पेरणी झालीय. आतापर्यंत कपाशीची सर्वाधिक ६ टक्के लागवड झाली असून, सोयाबीनसह पिकांची पेरणी २ ते ३ टक्केच आहे. औरंगाबाद, नाशिक विभागांत कपाशीची सर्वाधिक, तर कोल्हापूर विभागात तृणधान्याची सर्वाधिक पेरणी झाली आहे. अन्नधान्याची औरंगाबाद विभागात पेरणी झालीय. गळीतधान्याची औरंगाबाद, कोल्‍हापूर विभागांत अधिक पेरणी झाली आहे.

पेरणी झालेले क्षेत्र (कंसात सरासरी क्षेत्र)
बाजरी ७०२२ (६,७१,५९५)
भात ३५,१९६ (१४,९७,४४९)
खरीप ज्वारी ८१६ (४,८२,४६१)
रागी ६७३ (९४,७३१)
मका ६०९८ (८,३८,०६०)
तूर २६५७९ (१२,७५,९७१)
मूग ५६२० (४८३३४७)
उडीद ३५८९५३ (६०६५)
भुईमूग ६९९८ (१९८४३५)
तीळ ० (२३,६७२)
कारळे ५ (१९७२७)
सूर्यफूल ६ (१७९६५)
सोयाबीन ४९,९८४ (३८,८४,६३३)
कापूस २,६९,६४० (४१८३८०१)

खरिपात पारंपरिक पद्धतीशिवाय नवी पेरणी, लागवड पद्धत वापरण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. मात्र किमान ९० मिलिमीटर पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये, असे शेतकऱ्यांना आवाहन आहे. आता पाऊस काहीसा थांबला असल्याने पेरण्याही थांबल्या आहेत. मूग, उडदावर अन्य पिकांची पेरणी करण्यासाठी अजून अवधी आहे. - विलासराव नलगे,  कृषी उपसंचालक, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com