नगर जिल्ह्यात पावसाची ओढ; डोळे आकाशाकडे

पावसाअभावी पिके संकटात
पावसाअभावी पिके संकटात

नगर   : जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झाला नसल्याने पाणी साठवण झालेले नाही. पंधरा दिवसांपासून तर पाऊस पूर्णपणे गायब झाला असल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पेरलेली पिके जगवायची कशी या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भाग वगळता जिल्ह्यात कोठेही जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून तर पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणी, कापूस लागवड केली खरी; पण आता पिके हातची जातात की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर असून, त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ७४ हजार ४३९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सध्या खुरपणीसह शेतीची अन्य कामे उरकली जात आहेत. जिल्हाभर जलसंधारणाची चांगली कामे झाली असली तरी अजून कोठेच जोरदार पाऊस नसल्याने पाणी साठवण झालेले नाही. त्यामुळे पावसाने जास्ती काळ उसंत दिली तर पिके जगवायची कशी अशी चिंता आहे. गेल्यावर्षीही जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिला होता. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यंदाही तशी परिस्थिती येते की काय याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com