अमरावती जिल्ह्यात सात लाख हेक्टरवर खरीप नियोजन : कृषी विभाग

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्‍टरवर विविध पिकांच्या लागवडीसाठीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले. त्यासोबतच खरीप आणि रब्बी हंगामासाठी २१०० कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टही निश्‍चित करण्यात आले. 

पीक लागवडीमध्ये २ लाख ३० हजार हेक्‍टरवर कापूस, २ लाख ९५ हजार हेक्‍टरवर सोयाबीन व १ लाख २० हजार हेक्‍टरवर तूर व इतर पिकांचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ लाख ५० हजार क्‍विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली असून १ लाख ३३ हजार क्‍विंटल सोयाबीन बियाण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. 

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बीटी कापूस बियाणे बीजी-१ चे ६३५ रुपये, बीजी-२ चे ७३० रुपये दर निश्‍चित करण्यात आले आहेत. सुमारे ५ हजार १३० क्‍विंटल बीटी कापूस बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी १ लाख ४० हजार मेट्रिक टन खतांची आवश्‍यक असून, त्यानुसार खतांचा साठा उपलब्ध व्हावा, या संदर्भाने नियोजन करण्यात आले. पिकांवरील कीडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये पिकांवरील कीड नियंत्रणाविषयी जागृती केली जाणार आहे. प्रत्येक गावात कृषी सहाय्यक व कृषी तज्ज्ञांच्या बैठका घेत जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण केले जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com