नवी दिल्ली: राजस्थान, पंजाब आणि हरियाना राज्यांचा काही भाग वगळता मॉन्सूनने देश व्यापला आहे. गेल्या आठवड्यात देशभरात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रखडलेल्या खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत ४१३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणी ९ टक्क्यांनी माघारली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे. देशात यंदा मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्यानंतर प्रवास मंद गतीने राहिला. सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खरीप पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, मागील आठवड्यात वायव्य, पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत ४१३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. भात पेरणी ९८ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी ११० लाख हेक्टरवर भात होता. मागील आठवड्यापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के कमी भात लागवड होती मात्र देशात लागवडीला वेग आल्याने सध्या मागील वर्षीच्या तुलनेत ९ टक्के लागवड माघारली आहे. देशात मागील वर्षी ऊस लागवड याच काळात ५२ टक्के झाली होती. यंदा सध्या ५० लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत कडधान्य पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत ७१ टक्के कमी लागवड होती. मात्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश चांगला पाऊस झाल्याने पेरणीत वाढ होती ३४ लाख हेक्टरवर कडधान्य पेरणी झाली आहे. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के कमी कडधान्य पेरणी झाली आहे. कापूस लागवडीत गेल्या वर्षीच्या ७७.७ लाख हेक्टरपेक्षा वाढ होऊन ७७.७ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. तेलबिया लागवडीत घट होऊन ७६ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तर गेल्या वर्षी याच काळात ८४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन लागवडीतही १९ टक्के घट होऊन ५२ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. पेरणी दृष्टिक्षेपात
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.