नाशिकवरून किसान रेल्वे धावणार आठवड्यातून दोनदा

नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाली. या रेल्वेमुळे शेतीमाल थेटपरराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाली.
कोल्हापूर ः राजर्षी शाहू महाराज रेल्वे स्थानकावरून मनमाड किसान रेल्वे शुक्रवारी शेतमाल घेऊन मार्गस्थ झाली.
कोल्हापूर ः राजर्षी शाहू महाराज रेल्वे स्थानकावरून मनमाड किसान रेल्वे शुक्रवारी शेतमाल घेऊन मार्गस्थ झाली.

नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाली. या रेल्वेमुळे शेतीमाल थेट परराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाली. त्यामुळे मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोनवेळा रेल्वे सुरु  करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे.

रेल्वे आठवड्यातून  दोनवेळा सुरु करण्यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार यापुढे ही रेल्वे आठवड्यातून दोनदा देवळाली रेल्वे स्थानकातून धावेल.  

किसान रेल्वे सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत एकूण ३ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे ७८ , ९९ व १५१ टन असा एकूण ३२८ टन शेतमाल व कृषी पूरक साहित्य पाठवण्यात आले आहे. देवळाली कॅम्प येथून संध्याकाळी ६ वाजता निघेल. नाशिक रोड येथे संध्या. ६.१०, मनमाड येथे ७.३०, जळगाव येथे ९.५५ व भुसावळ येथे रात्री १०.४५ वाजता व दानापूरला गुरुवारी व रविवारी दुपारी २ वाजता पोहचेल. 

किसान रेल्वेद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या कृषि उत्पादनांना बाजारपेठ मिळून फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. पार्सल एक्सप्रेसमुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.  - चंद्रशेखर बारी, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य पणन मंडळ नाशिक विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com