पुणे ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी आहे. कोरडवाहूसाठी ८०, तर बागायतीसाठी १८० रुपये प्रति गुंठा अशी ही मदत असून, ही मदत जाहीर करून राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ही मदत आम्ही शेतकरी पंतप्रधान, राज्यपाल आणि कृषी आयुक्तांना परत देणार आहोत. यासाठी सोमवारपासून (ता. २५) राज्यभर करण्यात येईल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
येथे मंगळवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नवले बोलत होते. या वेळी किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे, कामगार नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते.
डॉ. नवले म्हणाले, की नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग रद्द करून, पंचनाम्यानुसार भरपाई जाहीर करावी. बीडमधील शेतकऱ्यांचा २०१८ चा पीकविमा कंपनीने दिलेला नाही. कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन सुरू केले असून, सरकार नसल्याने कंपनीदेखील दखल घेत नाही. सर्वच राजकीय पक्षांचा अतिवृष्टिग्रस्त भागातील दौरा म्हणजे कृषी पर्यटन असून, यानंतर पुढे काहीही झालेले नाही. काय म्हणाले डॉ. नवले पहा video
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.