कोतुळला गावकऱ्यांचा किसान सत्याग्रह दुसऱ्या दिवशी सुरूच

The Kisan Satyagraha starting by the villagers in Kotul the next day
The Kisan Satyagraha starting by the villagers in Kotul the next day

नगर :कोतुळ (ता. अकोले) येथील पुलाचे प्रलंबित काम तातडीने सुरू करा, तोलर खिंड फोडून कोतुळ पंचक्रोशीला मुंबई महामार्गाशी जोडा, कोतुळसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन द्या, या व इतर मागण्यांसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सत्याग्रह सुरू केला आहे. गुरुवारी (ता. ६) तो दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. 

कोतुळ व परिसरातील साधारण ३५ गावांना जोडणारा पूल पिंपळगाव खांड धरण भरले की पाण्याखाली जातो. त्यामुळे कित्येक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. 

३० मागण्यांवर कार्यवाही करा

दरम्यान, वरील मागाण्यांसह रस्ते, वीज, पाणी यांसह ३० मागण्यांवर कारवाई करावी, अन्यथा कोतुळ बंद पुकारून हजारो शेतकरी कोतुळ ते अकोले पायी लाँगमार्च काढतील, असा इशारा डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, साहेबराव घोडे, एकनाथ मेंगाळ यांनी दिला. शेकडो सत्याग्रही थंडीत कोतुळच्या मुख्य चौकात ठाण मांडून बसून आहेत. सचिन गीते, अरविंद देशमुख, गुलाब खरात सहभागी झाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com