वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका शक्य 

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये उद्या रूपांतर होण्याची शक्यता आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. या क्षेत्राचे चक्रिवादळामध्ये उद्या रूपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे वारे वेगाने वाहणार असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  लक्षद्वीप परिसर आणि अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात गुरुवारी हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होते. आज (ता.१४) या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढून ते उत्तर- वायव्यकडे गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या दिशेने ते सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ आणि लक्षद्वीप परिसरात १४ ते १७ मे या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (शनिवारी) तमिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणपूर्व आणि मालदिव कोमोरीन आणि लक्षद्वीप लगतच्या भागात, केरळ किनारपट्टी व पूर्व मध्य अरबी समुद्रासह आणि कर्नाटक गोवा व कोकण किनारपट्टीवर जाऊ  नये, तसेच ते समुद्रात मच्छीमारांसाठी गेले आहेत, त्यांनीही परत येण्याचा इशारा दिला आहे.  चक्रीवादळामुळे १५ आणि १७ मेच्या दरम्यान कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रा दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी ४० ते ५० किलोमीटर वेग राहणार तो हळूहळू वाढत जाईल. साधारणपणे जास्तीतजास्त ताशी ७०-८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरात मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात काही अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले असून उकाड्यात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.  दक्षिण महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा  अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका मध्य महाराष्ट्र व कोकणला बसणार आहे. रविवारपासून (ता.१६) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले पिके शेडमध्ये, प्लॅस्टिकच्या कागदामध्ये झाकून ठेवावे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. याशिवाय फळधारणेवर असलेली पिके व भाजीपाला पिके यांना काठीचा आधार देऊन बांधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस  शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ  शनिवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा,संपूर्ण मराठवाडा व विदर्भ  रविवारः संपूर्ण महाराष्ट्र  सोमवार ः संपूर्ण महाराष्ट्र  गुरूवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रुझ) ३४.३ 
  • अलिबाग ३४.६ 
  • रत्नागिरी ३४.६ 
  • डहाणू ३४.५ 
  • पुणे ३६.६ 
  • जळगाव ४१.० 
  • कोल्हापूर ३५.१ 
  • महाबळेश्वर २९.६ 
  • मालेगाव ४२.४ 
  • नाशिक ३६.३ 
  • सांगली ३७.४ 
  • सातारा ३७.२ 
  • सोलापूर ३९.५ 
  • औरंगाबाद ३८.७ 
  • परभणी ४०.७ 
  • नांदेड ४१. 
  • अकोला ४२.२ 
  • अमरावती ४१.२ 
  • बुलडाणा ३९.६ 
  • चंद्रपूर ४३.२ 
  • गोंदिया ४१.२ 
  • नागपूर ४२.२ 
  • वाशिम ४१.६ 
  • वर्धा ४२.५ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com