कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यात पश्‍चिम भागात पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रात थांबून थांबून पाऊस असल्याने धरणांतील पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच असल्याने येत्या दोन दिवसांत नद्यांच्या पाण्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली होते. गगनबावड्यात सर्वाधिक ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राधानगरीत २० मि.मी.पावसाची नोंद झाली. पूर्वेकडील तालुक्‍यात ढगाळ हवामान कायम होते. धरणांच्या पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

जरी पाऊस थांबला तरी थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नद्यांच्या पात्रात सुरुच रहाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत तरी पाण्याचे पाणी गतीने ओसरण्याची शक्‍यता कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परिणामी पाण्याखाली गेलेले बंधारे अतिशय धीम्या गतीने पूर्ववत होतील असे सांगण्यात आले.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २०१.१४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली. सरासरी १६.७६ टक्के पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे ः हातकणंगले ४.७५, शिरोळ २.८५, पन्हाळा १२.८६, शाहुवाडी ४३.१६, राधानगरी २०.१७, करवीर ९.६३, कागल १३, गडहिंग्लज ४.८५, भुदरगड १६.२०, आजरा १३ व चंदगड १६.६७ अशी एकूण २०१.१४ मि.मी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com