कणकवली, जि. सिंधुदुर्ग : मृग नक्षत्राच्या पुर्वसंधेला कोकणात मॉन्सूच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. समुद्राचे पाणी गढूळ असले तरी सागरी लाटांचा मारा अद्याप सुरू झालेला नाही. पण नैसर्गिक हालचालींचा वेग मात्र वाढला आहे. गेले आठ दिवस पावसाने अधूनमधुन पावने हजेरी लावल्याने खंरीप हंगामातील पेरणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत एकूण 874.6 मिमी. मिळून सरासरी 109.32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे आगमन तसे शांततेत झाले. मात्र मॉन्सून सध्यातरी सक्रीय झालेला नाही. आज मृगनक्षत्र असल्याने सायंकाळी उशीरापर्यत पावसाचे मॉन्सूनचे आगमन होईल असा अंदाज मांडला जात आहे. पण अरबीसमुद्राच्या हालचालीत मोठा बदल झाला नव्हता. दुपारी समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे सायंकाळी किंवा रात्री उशीराने मॉन्सूनचे जोरदार आगमन होईल असे भाकीत शेतकरी आणि खलाशी व्यक्त करीत आहेत.
गेल्या आठ दिवसात दमदार पाऊस झाल्याने भात पेरणीला सुरूवात झाली आहे. तर सह्याद्रीच्या कुशीतील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रवाहीत होऊ लागले आहे. पावसामुळे बाजारपेठात शेती आणि औजारे खरेदीसाठी लगबग वाढू लागली आहे.
जिल्हा प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा सिंधुदुर्गात 7 ते 11 जून या कालावधीत अतिवृष्टी होणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असा अतिदक्षतेचा इशारा निवाशी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनचे मुख्यकार्यकारि अधिकारी विजय जोशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे. वीजाच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून समुद्राच्या लाटापासून दुर राहण्याचा सावधतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.